लातूर: जिल्ह्यात कोरोनामुळे ५० रुग्ण दगावले असल्याची बातमी समोर आली आणि एकाच खळबळ उडाली. लातूर जिल्ह्यात एकाच दिवसात ५० रुग्ण कोरोनामुळे दगावले असे वृत्त सर्वत्र पसरले होते. मात्र या बातमीत कुठलेही तथ्य नसल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ही बातमी चुकीची असल्याचे सांगितले असून खरी आकडेवारी देखील त्यांनी या वेळी प्रेस नोट मधून सांगितली आहे.
जिल्ह्यात पोर्टलवर एकूण तीन दिवसाच्या ५० मृत्यू अपलोड केलेले असल्यामुळे एकूण मृत्यूची संख्या ९३४ एवढी झालेली आहे. रविवारी एका दिवसात एकूण ५० मृत्यू झालेले नसून ते तीन दिवसात झालेले आहेत, असा खुलासा प्रेस नोट द्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे. दिनांक १६ एप्रिल ते १८ एप्रिल या तीन दिवसांची एकूण मृत्यूची आकडेवारी ५० आहे. दि. शुक्रवारी एकूण १३ जण कोरोनामुळे दगावले असून शनिवारी हा आकडा २६ होता तर रविवारी एकूण ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे एकूण ५० रुग्ण तीन दिवसात दगावले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच या वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत असून कडक निर्बंध तसेच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी स्वतःची काळजी घेत घरातून विनकारण बाहेर पडू नये, असे आवाहन येथील स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनमध्ये आणखी कडक निर्बंध केले पाहिजेत – राजेश टोपे
- तुमच्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का? ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’ करा आणि रहा बिनधास्त
- रविवारी ‘इतके’ लोक विनाकारण निघाले घराबाहेर! त्यातून सहा पॉझिटिव्ह
- कोरोनाची परिस्थिती बिकट, तातडीने अधिवेशन बोलवा : चंद्रकांत पाटील
- परभणी जिल्ह्यात तालुकास्तरावर ५० बेडचे कोविड सेंटरची उभारणी करा : आ. लोणीकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

