Share

‘नाथाभाऊ आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केलं नाही’

Published On: 

🕒 1 min read

जळगाव : २०१९ विधानसभा निकालानंतर शिवसेनेनं साथ सोडल्यामुळे सर्वाधिक जागा येऊन देखील भाजपला विरोधी बाकावर बसावं लागलं आहे. तर, महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं आहे. हे सरकार जनतेच्या विश्वासघातातुन आले असून कोरोना स्थिती हाताळण्यात देखील अपयशी ठरले आहे. हे सरकार स्वतःच्या कर्माने पडेल असं भाकीत देखील फडणवीसांनी वर्तवलं होतं.

सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळत आहे. तर, भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून माशासारखे तडफडत आहेत. ते ब्राम्हण असले तरी त्यांची सरकार पडणार असल्याची भाकिते खरे ठरतं नाही. सत्ता कधी येईल यासाठी मला वाटतं त्यांना रात्री बेरात्री पण त्यांना स्वप्न पडत असेल, अशी टीका एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर शुभारंभ प्रसंगी केली होती.

त्यांच्या या टीकेला भाजप आमदार राम सातपुते यांनी जोरदार प्रत्युत्तर देत खडसेंवर गंभीर आरोप केला आहे. ‘नाथाभाऊ आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केलं नाही आणि देवेंद्र भाऊ बद्दल बोलत आहात. विरोधी पक्षनेता असताना तोडपाणी आणि मंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचार. निष्कलंक देवेंद्रजीवर बोलण्या अगोदर आरसा बघा सगळं लक्षात येईल.’ असा घणाघात राम सातपुते यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!