Share

फोन कोणत्या तोंडाने करायचा ?असा प्रश्न पडल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवले असावे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोना विषाणू संसर्गाला नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. या संबंधीचे पत्र मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पाठवले आहे. या पत्रावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टीका केलीय. मुख्यमंत्र्यांनी सरळ फोन न करता पत्र पाठवले असल्यामुळे भातखळकर यांनी ही टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी या आधी कडक लॉकडाऊनची घोषणा करतानाच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ऑक्सिजनची मागणी करणार असल्याचे सांगितले होते. त्यासाठी लवकरच पंतप्रधानांना पत्र पाठवणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यावरही भाजप नेत्यांनी टीका करत हे आधीच करायला हवे होते, असा आरोप केला होता. आता मुख्यमंत्र्यांनी नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याची मागणी केली आहे. यावरही भाजप नेत्यांनी टीका केली आहे. या विषयी सोशल मीडियावर अतुल भातखळकर यांनी पोस्ट केलीय. यामध्ये ते म्हणाले की, ‘ज्यांच्यावर सतत खोटारडी टीका करतो त्यांना फोन कोणत्या तोंडाने करायचा ?असा प्रश्न पडल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना (मागणी) पत्र पाठवले असावे.’

कोरोना ही जागतिक महामारी आधीच घोषित करण्यात आली आहे. आता मुख्यमंत्र्यांनी याला नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याची मागणी केली आहे. नैसर्गिक आपत्ती घोषित झाल्यास, राज्याला या संकटाचा सामना करण्यासाठी अतिरीक्त निधी मिळेल. त्यामुळे राज्य सरकारला संकटाचा सामना करण्यासाठी अधिक मदत होणार आहे. मात्र, केंद्र सरकार कोणता निर्णय घेते, ते पाहावे लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या   

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!