🕒 1 min read
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जनतेशी सवांद साधला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने, लॉकडाऊनचा धोका टळलेला नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. अशीच ररुग्णवाढ सुरु राहिली तर पुढील १५ दिवसांत हॉस्पिटले तुडुंब भरून जातील. असेही ते यावेळी म्हणाले होते. मात्र आधीच आर्थिक अडचणींनी पिचलेल्या जनतेला कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन नको आहे. त्यामुळे आता लॉकडाऊनचा काउंटडाऊन सुरु असताना राज्यात मोठा गहजब मजला आहे.
यावर आजच्या सामना अग्रलेखात गेल्या वर्षभरापासूनचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. तर उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या लॉकडाऊनला विरोध करण्यावर देखील टीका करण्यात आली आहे. ‘कोरोनामुळे देशाची गती मंदावली आहे, पण राजकारणातले वारे जोरात सुरू आहेत. महाभारताचे युद्ध 18 दिवसांचे. कोरोनाचे युद्ध 21 दिवसांत जिंकू, असे वर्षभरापूर्वी आपले पंतप्रधान म्हणाले. कोरोना पराभूत झाला नाही, पण ममता बॅनर्जींना हरविण्यासाठी राजकीय युद्ध सुरूच आहे. आता भीती कोरोनाची नसून लॉक डाऊनची आहे.
कोरोना ही अंधश्रद्धा वगैरे नसून महामारीचे संकट आहे. पंतप्रधान मोदी यांनी लॉक डाऊन काळात लोकांना थाळय़ा व टाळय़ा पिटायला लावले. पण त्यामुळे कोरोना गेला नाही. कोरोनाचा संबंध कोणत्याही जाती-धर्माशी नाही. त्यामुळे घंटा बडवून, अजान देऊनही तो थांबणार नाही. आनंद महिंद्रा यांच्यासारख्या उद्योगपतीने महाराष्ट्रात लॉक डाऊन करण्यास विरोध केला आहे, पण पंतप्रधान मोदी यांच्या राष्ट्रीय लॉक डाऊन मोहिमेत महिंद्रा सामील झाले होते व त्यांनी थाळय़ा पिटण्याचा आनंदही साजरा केला होता; पण पुन्हा लॉक डाऊन नको ही त्यांची भावना चुकीची नाही. पहिल्या लॉक डाऊनला वर्ष झाले. 24 मार्च 2020 च्या संध्याकाळी पंतप्रधान मोदी यांनी अचानक संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केला. त्यानंतर जे घडत गेले ते धक्कादायक आणि अमानुष होते. अशी टीका आजच्या सामनाच्या रोकठोक सदरामधून करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईत आयपीएल सामने होण्याबाबत साशंकता ; ‘या’ शहरात सामने होण्याची शक्यता
- ‘लोकांना ‘टाळेबंदी’ नको हे मान्य, पण ‘कोरोना’ला कसे थोपवायचे ?’
- ‘हा’ फलंदाज सामना जिंकणारा खेळाडू आहे : सौरव गांगुली
- ‘आता भीती ‘कोरोना’ या विषाणूची नसून ‘लॉकडाऊन’ या सैतानाची आहे’
- ‘आणखी दोन-तीन वर्षे निवृत्तीचा विचार करणार नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
