Share

‘अनिल देशमुखांच्या चौकशीसाठीची समिती नेमून सरकारने जनतेला एप्रिल फूल केले’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचे धक्कादायक आरोप केले होते, त्यानंतर या आरोपांच्या चौकशीसाठी समितीची नेमणूक करण्यात आली आहे. निवृत्त न्यायाधीश कैलास चांदीवाल यांच्या नेतृत्वाखाली या समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात सहा महिन्यांत समितीला अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, भाजपने या मुद्द्यावारून सरकार टीका केली आहे.राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी चांदीवाल चौकशी समिती स्थापन केली आहे. मात्र राज्य सरकारने 1 एप्रिलच्या 2 दिवस आधीच जनतेला अक्षरश: एप्रिल फूल बनवले आहे, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी केली.

भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.परमबीर सिंग उच्च न्यायालयात गेल्यामुळे राज्य सरकारने बुधवारी कैलास चांदीवाल समिती स्थापन केली. ही समिती, चौकशी आयोग अधिनियम, १९५२ अंतर्गत नेमलेली नाही. त्यामुळे या समितीला कोणालाही नोटीस बजावण्याचा अधिकार नाही असे त्यांनी म्हटले आहे.

समितीकडून संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी बोलावल्यावर उपस्थित राहिलेच पाहिजे असे बंधनही नसेल. त्यामुळे ही समिती म्हणजे केवळ जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रकार आहे,’ अशी टीका उपाध्ये यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!