पुणे : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावतीने अनिल देशमुख यांच्याविरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद सुरु आहे आहेत. परमबीर सिंग यांचे वकील विक्रम ननकानी बाजू मांडत आहेत. परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठात सुनावणी होत आहे.
यावेळी परमबीर सिंहांनी कोर्टात धक्कादायक माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांना गृहमंत्री सातत्यानं वसुलीचे निर्देश देत होते. मुंबई पोलिसांना डावलून पोलीस अधिकाऱ्यांअॅडव्होकेट ना शासकीय निवासस्थानी बोलावलं जायचं. अशी माहिती परमबीर सिंहांनी कोर्टात दिली आहे. तर मोहन डेलकर प्रकरणातही मी प्रशासनाला सांगितलं होतं की हा गुन्हा इथं दाखल होऊ शकत नाही. तो दादरा नगर हवेली इथंच दाखल व्हायला हवा. तेव्हाही गृहमंत्री माझ्यावर नाराज झाले होते. मी आणि पोलीस दलानं नेहमीच कायद्याचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला. मात्र गृहमंत्र्यांकडून त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी सातत्यानं फोर्सवर दबाव टाकला जात होता, अशी धक्कादायक माहिती परमबीर सिंहांनी कोर्टात दिली आहे.
परमबीर सिंग यांच्यावतीनं विक्रम ननकानी यांनी बाजू मांडण्यास सुरुवात केली. तर, अॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी हे राज्य सरकारच्या वतीनं बाजूनं मांडत आहेत. राज्य सरकारला या आरोपांमधील तथ्य शोधून काढायचं आहे. आरोपांविषयीचं तथ्य बाहेर आणायचं आहे त्यामुळं ही जनहित याचिका फेटाळावी, असा युक्तिवाद कुंभकोणी यांनी केला. यानंतर न्यायालयानं तथ्य मांडण्यास सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
- दीपालीच्या चव्हाण प्रकरणात एमएस रेड्डी यांना सहआरोपी करण्याची मागणी का होतेय ?
- ‘आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू बायको म्हणून पहिजेल’ ; पहा चाहत्याच्या कमेंटवर राजेश्वरीचा भन्नाट रिप्लाय
- महाविकास आघाडी सरकारने सावकारी पद्धतीची विजबिल वसुली थांबवावी – आम आदमी पार्टी
- त्या नालायक विश्वजीत कदमने माझ्यावर अत्याचार केला, अभिजीत बिचुकलेंचा धक्कादायक आरोप
- ‘आरएसएसचे लोक देशभक्त आहेत आणि इतर सर्व देशद्रोही आहेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

