🕒 1 min read
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या गंभीर आरोपानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलाच तापल आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं असून त्यात त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिल्याचा दावा केला आहे. या आरोपानंतर देशमुख चांगलेच अडचणीत सापडले आहेत. भाजपच्या नेत्यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
यावर आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झडत आहेत. भाजपचे नेते या प्रकरणावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर अजुन एक आरोप केला आहे. ‘हातभट्टीवाल्यांकडूनही गृहमंत्र्यांनी हप्ता वसुलीचे टार्गेट दिले गेले असेल…’ अस ट्विट करत भातखळकर यांनी देशमुखांवर प्रहार केला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जिल्ह्यात घरोघरी दारुनिर्मिती, पोलिसांच्या तपासात धक्कादायक प्रकार उघडकीस…
स्थानिक पोलिस कमिशनरना या हातभट्टीवाल्यांकडूनही गृहमंत्र्यांनी हप्ता वसुलीचे टार्गेट दिले गेले असेल… pic.twitter.com/HTECjE6UIn— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 23, 2021
दरम्यान, ‘गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जिल्ह्यात घरोघरी दारुनिर्मिती, पोलिसांच्या तपासात धक्कादायक प्रकार उघडकीस… स्थानिक पोलिस कमिशनरना या हातभट्टीवाल्यांकडूनही गृहमंत्र्यांनी हप्ता वसुलीचे टार्गेट दिले गेले असेल…’ असा घणाघात भातखळकरांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पुर्वी बैलगाडी भरुन पुरावे होते आता पेन ड्राईव्ह भरुन झाले’, कॉंग्रेस नेत्यानी उडवली खिल्ली
- टीम इंडियाच्या फलंदाजीला सुरुवात ; रोहित-शिखर सलामी जोडी मैदानात
- आज अखेर जॅग्वारची इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतीय बाजारात दाखल
- पिकविमा अध्यादेशाची शेतकऱ्यांकडून होळी
- फालतू गोष्टींवर बोलताना शांत होऊन बोलण्याचा प्रयत्न कर ; मांजरेकरांनी विराटला दिला खास सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

