🕒 1 min read
पुणे : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात थोड्याच वेळात पहिल्या एकदिवसीय सामन्याला सुरुवात होणार आहे. ही पहिली वनडे मॅच पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तसेच टीम इंडिया प्रथम फलंदाजी करणार आहे. यावर विराटने प्रथम फलंदाजी मिळाल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे. थोड्याच वेळात एकदिवशीय सामन्याला सुरुवात होणार आहे.
दरम्यान, भारताचे माजी खेळाडू समालोचक संजय मांजरेकर यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला खास सल्ला दिला आहे. लोकांच्या टीकेवर किंवा चर्चांवर बाहेरच्या गोष्टींवर थोडंस शांत होऊन बोलण्याचा प्रयत्न कर किंवा याच्यापासून शक्य होईल तेवढं लांब रहा, असा सल्ला मांजरेकर यांनी विराटला दिला आहे.
Outside talk which Virat calls nonsense is basically public reacting to a public performance. And it’s always been the same- Praise when you do well, critique when you don’t. Virat must learn to accept this age old reality with calmness & maturity. Just like Dhoni did.
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) March 23, 2021
इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत के.एल. राहुल वरच्या टीकेसंबंधी प्रश्न विचारल्यानंतर विराटने बाहेरच्या फालतू गोष्टी, असा उल्लेख केला होता. याच पार्श्वभूमीवर संजय मांजरेकर यांनी ट्विट करुन विराटला खास सल्ला दिला आहे. अशा बाहेरच्या गोष्टींवर बोलताना शांत होऊन बोलण्याचा प्रयत्न कर, असं मांजरेकरांनी सांगितलं आहे.
???? "We will continue backing our players." #TeamIndia captain @imVkohli stresses the importance of keeping the players in good mental space. #INDvENG @Paytm pic.twitter.com/qy7AqmrW6O
— BCCI (@BCCI) March 22, 2021
मांजरेकर यांनी विराटला सल्ला देताना महेंद्र सिंग धोनीची आठवण काढली आहे. मांजरेकर म्हणाले, विराटने वस्तुस्थितीचा संयम आणि परिपक्वतेने स्वीकार करायला हवा, जसा धोनीने केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय; दिल्लीत कायदेशीर मद्यपान करण्याचे वय आता २५ वरून २१
- …तर टेस्ला कंपनी बंद करणार एलन मस्क यांची भूमिका
- वाळू माफियाकडून दीड लाखाची लाच घेताना तहसीलदार अटकेत
- आणखी दोन दिवस राज्यात पाऊस बरसणार, बळीराजाच्या चिंतेत वाढ
- राष्ट्रपती राजवटीची मागणी तर महिन्यातून दोन-तीन वेळा होते,त्यात नवीन काय?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

