Share

‘…परंतु त्यांनी वनडे मालिकेत राहुलला आणखी एक संधी द्यायला हवी’ ; गौतम गंभीर

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : पाच टी20 सामन्यां 2-2 अशी बरोबरी असताना अखेर भारतीय संघाने पाचव्या आणि निर्णायक क्रिकेट सामन्यात बाजी मारली आहे. दमदार फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बळावर संघाला हे यश संपादन करण्यात आलं. भारत आणि इंग्लंड यांच्यात पार पडलेल्या ५ टी२० सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने ३-२ ने विजय मिळवला आहे. मात्र यानंतर भारतीय संघावर आयसीसीतर्फे दंड आकारण्यात आला आहे.

तसेच संघाच्या फलंदाजी क्रमवारीत बदलदेखील पाहायला मिळाले. पहिल्या ४ टी-२० सामन्यात केएल राहुलने डावाची सुरुवात केली होती. परंतु त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे ५ व्या टी -२० सामन्यात त्याला संघात स्थान मिळाले नव्हते. सध्या खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या राहुलचे माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने समर्थन केले आहे.

गंभीरने राहुलला समर्थन देत म्हटले आहे की, ‘कोणालाही संघातून वगळून आपण त्याची मदत करू शकत नाही. राहुलने इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेत खेळावे. जर कोणी चांगल्या फॉर्ममध्ये नसेल तर त्याला खेळण्याची संधी उपलब्ध करून दिल्यास तो खेळाडू पुन्हा फॉर्ममध्ये येऊ शकतो.’

तसेच गंभीर पुढे म्हणाला की, ‘भारतीय संघ ६ गोलंदाजांसह मैदानात उतरला. मी या निर्णयाशी सहमत आहे. कारण भारतीय संघात नेहमीच गोलंदाजांची कमतरता जाणवते. यावर एकच उपाय होता, केएल राहुलला बाहेर काढून एका गोलंदाजाला संघात संधी देण्यात यावी. हीच रणनिती भारतीय संघाने अंमलात आणली. परंतु त्यांनी वनडे मालिकेत राहुलला आणखी एक संधी द्यायला हवी.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!