Share

मुंबईची बातच न्यारी; फक्त चार चेंडुत मिळवला विजय

Published On: 

🕒 1 min read

इंदोर : मुंबई क्रीडारसिकासाठी काही दिवस फारच आनंदाचे गेले आहेत. क्रिडा क्षेत्रात मुंबईच्या संघाने एकामागोमाग दैदीप्यमान कामगिरी केली आहे. आयएसएल असो वा विजय हजारे करंडक दोन्हीकडे मुंबईच्या संघाने जोरदार कामगिरी करत जेतेपद पटकावले. आता महिला वरिष्ठ खेळाडूंच्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत मुंबईच्या संघाने अवघ्या चारच चेंडुत विजय मिळवण्याचा पराक्रम केला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महिलांच्या वरिष्ठ खेळाडूंची एकदिवसीय करंडक स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. या स्पर्धेत बुधवारी पार पडलेल्या सामन्यात मुंबईच्या महिला संघाने नागालँडच्या संपुर्ण संघाला फक्त १७ धावांवर माघारी तंबुत धाडले. यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने विजयाचे लक्ष्य फक्त चार चेंडूत एकही गडी न गमवता पार केले.

इंदोर येथील होळकर मैदानावर झालेल्या या सामन्यात मुंबईच्या गोलदांजानी धडाकेबाज कामगिरी केली. या सामन्यात कर्णधार आणि जलद गोलंदाज सायली सातघरेने अवघ्या पाच धावा देत सात गडी बाद केले. नागालँड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय त्यांच्यासाठी घातक ठरला. अवघ्या १७.४ षटकात नागालँडचा संपुर्ण संघ १७ धावांवर तंबुत माघारी परतला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!