🕒 1 min read
मुंबई- टिआरपी घोटाळ्याचे तपास अधिकारी सचिन वाझे एनआएच्या अटकेत असताना रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामींविरोधात ठोस पुरावे आहेत तर आरोपपत्रात त्यांचे नाव का नाही? त्यांच्यासह रिपब्लिक वाहिनीची मालकी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर संशयित आरोपी म्हणून किती काळ टांगती तलवार ठेवणार? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे.
गोस्वामी यांच्यावर कारवाई केली जाणार आहे का, प्रकरणाचा तपास किती वेळात पूर्ण करणार हे आज सुनावणीवेळी स्पष्ट करावे, असेही न्यायालयाने पोलिसांना बजावले आहे.या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची विनंती करणाऱ्या याचिका एआरजी कंपनी व गोस्वामी यांनी केल्या आहेत. त्याविषयी न्या. संभाजी शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर सध्या सुनावणी सुरू आहे.
टीआरपी घोटाळा प्रकरणी दाखल एफआयआर आणि आरोपपत्रातही नाव नसताना अशाप्रकारे एखाद्यावर टांगती तलवार लावून ठेवणं योग्य आहे का? गेल्या तीन महिन्यांत जर अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात तुमच्याकडे कोणताही पुरावा उपलब्ध झालेला नाही तर मग आम्ही त्यांना दिलासा का देऊ नये? असा सवालही यावेळी हायकोर्टानं उपस्थित केला.
याप्रकरणी विशेष सरकारी वकीलांकडे कोणतीही ठोस उत्तर उपलब्ध नसल्याबद्दल न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या खंडपीठानं तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच ठरलेल्या वेळेच्या अर्धा तास आधीच ही सुनावणी आटोपती घेत अर्णब गोस्वामींना दिलेला दिलासा तूर्तास कायम ठेवला आहे.
- महत्वाच्या बातम्या
- चौथा सामना जिंकण्यासाठी भारताला कराव्या लागतील ‘या’ चार गोष्टी
- नांदेड जिल्ह्यात कर्जबाजारी झालेल्या दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
- परभणीकरांनी महानगरपालिकेचे थकवले ९३ कोटी; करवसुलीसाठी मनपा आक्रमक
- इशान किशनच्या फलंदाजी क्रमवारीत बदल केल्याने संजय मांजरेकरांची टिका
- युवराजची बॅट पुन्हा तळपली; पुन्हा केली षटकांराची बरसात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
