Share

म्हणून उद्योग बंद करण्याची गरज नाही – जिल्हाधिकारी चव्हाण

Published On: 

औरंगाबाद : शहरची आर्थिक घडी आद्योगिक क्षेत्रावर अवलंबून आहे. मागीलवेळी कोरोनावाढीसाठी काही कंपन्या जबाबदार ठरल्या होत्या. म्हणून, यावेळी आम्ही उद्योगक्षेत्रांना सर्व नियम पाळण्याच्या कडक सूचना केलेल्या आहेत. आणि त्या ते पाळतदेखील आहेत. उद्योग बंद करण्याची तूर्तास तरी गरज वाटत नाही. मी अनेक कंपन्यांमध्ये पाहणी केली असून तेथे सर्व नियम पाळले जात असल्याचे निदर्शनास आले आहे, असे मत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, शहरातील १० हजारांहून अधिक कामगार कंपन्यांशी संलग्नित आहेत. या सर्वांचा विचार करणे गरजेचे आहे. कंपन्या आपआपल्या कामगारांच्या टेस्टिंग करत आहेत. मास्क वापरणे बंधनकारक केले आहे, सॅनिटायझर बंधनकारक केले आहे. यातून कंपन्या आवश्यक ती काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे.

यावेळी कंपन्यांच्या बसमध्ये असलेल्या प्रवाशी संख्येबाबत होणाऱ्या उल्लंघनाबाबत बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, वसाहतींमधून कंपन्यांमध्ये जाताना बसेसमध्ये मर्यादित संख्येबाबत बंधने घालण्यात येतील, तसेच प्रत्येक बस परिवहन विभागातर्फे, पोलीस आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्याकडून देखील मोठ्या प्रमाणात या बसेसची नियमित तपासणी करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!