🕒 1 min read
लातूर : जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा गावातील सर्वात मोठा असलेला तलाव पुर्ण भरल्याने तलावाच्या पाळूला तडे गेले आहे. या तलावाची निर्मीती १९७२ मध्ये करण्यात आली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सिमेवरील हा तलाव यंदा पुर्ण भरला आहे. महत्वाची बाब म्हणजे तलावाचा पाळू मोठा असल्याने त्यावर मोठमोठी झाडे उगवली आहे.
शासनाच्या पाटबंधारे विभागाच्या वतीने निलंगा तालुक्यातील महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सीमेवर वसलेल्या कासार बालकुंदा परिसरात १९७२ साली मोठ्या क्षमतेच्या तलावाची निर्मिती करण्यात आली. या तलावाच्या देखभालीकडे परिसरात अलीकडे दुर्लक्ष होत आहे. या तलावाच्या पाळूची रुंदी अधिक आहे. त्यामुळे या पाळूवरच मोठमोठी झाडे उगवली आहेत. या उगवलेल्या झाडांच्या मुळे खोलवर पसरली गेली आहे. या झाडांच्या मुळांमुळे पाळूलाच आता तडा जाऊन भेगा पडल्या आहेत.
पाळूला तडा गेल्याने पाळूवरून पलीकडच्या शेतीत जाणाऱ्या शेतकऱ्यांनी मोठी आडचण झाली आहे. महत्वाची बाब म्हणजे सांडव्यातून पाणी झिरपून पलीकडे जात आहे. यामुळे सांडव्यांची भिंतही पाणी झिरपून ढासऴण्याच्या मार्गावर आहे. तेव्हा धोका वेळीच ओळखून संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पाळूची दुरुस्ती करावी, अशी मागणी गावकऱ्यांतून होत आहे. यावर अभियंता मल्लिकार्जून पाटील यांनी,’आम्हाला तलावाच्या पाळूचे फोटो प्राप्त झाले असुन लवकरच आम्ही दुरुस्तीसाठी प्रयत्न करु. आणि पाळूच्या दुरुस्तीबाबत प्रस्ताव पाठवणार’ असे सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- महामंडळासाठी मुख्यमंत्र्यांना ‘एक लाख पत्र पाठवा’ आंदोलन
- “ठाकरी बाणा” खुर्चीसाठी एवढा लाचार होऊ शकतो ?
- उमेदवारांनो, ग्रामपंचायत निवडणूक खर्चाचा हिशोब द्या, अन्यथा…
- बीड जिल्ह्यातून राम मंदिरासाठी १ कोटी ४३ लाखांची देणगी
- वरळीतील ‘त्या’ पब आणि बारवर कारवाई करणार; चौफेर टीकेनंतर आदित्य ठाकरेंची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
