Share

अवघ्या २७ धावा फटकावून विराट ठरला ‘या’ विक्रमाचा मानकरी

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : गुजरात येथील भारत आणि इंग्लड संघादरम्यान सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने अवघ्या २७ धावा करत एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. केवळ २७ धावांच्या छोट्या खेळीसह विराट कोहलीने कर्णधार म्हणून इंग्लंडविरुद्ध आपल्या २००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. यासह विराट कोहली हा इंग्लंडविरुद्ध २००० धावांचा टप्पा पार करणारा पहिला भारतीय ठरला आहे आणि जागतिक क्रिकेटमधील पाचवा कर्णधार बनला आहे.

ही कामगिरी याआधी ऑस्ट्रेलियाचा अॅलन बॉर्डर (३१९१), दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ (२९७८), ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग (२७२६) आणि ऑस्ट्रेलियाचा डॉन ब्रॅडमन (२४३२) यांनी केली होती. आहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बुधवारपासून सुरु असलेल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजानी जोरदार कामगिरी करत इंग्लड संघाचा डाव अवघ्या ११२ धावावंर आटोपला. भारताकडून अक्षर पटेलने ६ विकेट्स घेतल्या

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने ६ गडी गमावत ११७ धावा करत ५ धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून रोहित शर्माने शानदार अर्धशतक झळकावत ६६ धावा केल्या आहेत. तर इंग्लड संघाकडून जॅक रिचने सर्वाधीक ४ विकेट्स घेतल्या आहेत. आर आश्विन हा २ धावावर खेळत होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!