🕒 1 min read
अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या जोडीने 3 बाद 99 धावांपासून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. या जोडीकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा होती परंतु राहणे अवघ्या सात धावतच तंबूत परतला. राहणे आउट झाल्यानंतर पंत रोहितची साथ द्यायला मैदानात आला आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना आज (दि. २४ फेब्रुवारी) आहे. या कसोटीचे दोन खास वैशिष्ट्ये आहेत. हा डे-नाईट कसोटी सामना असून गुलाबी चेंडूने खलवण्यात येईल. दुसरं म्हणजे सामन्याचे आयोजन जगातील सर्वात मोठ्या स्टेडियम अर्थात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी (मोटेरा) स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या स्टेडियममध्ये हा पहिलाच सामना खेळवला जात आहे.
इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाचा इंग्लंडला पश्चाताप होईल अशी स्थिती भारतीय गोलंदाजांनी केली. सुरुवातीपासूनच एका मागोमाग एक धक्के बसलेल्या इंग्लंडकडून झॅक क्रॉली ( ८४ चेंडूत ५३ धावा ) वगळता कोणालाच चांगली कामगिरी करता आली नाही. अक्सर पटेलने निम्म्याहून अधिक म्हणजेच ६ बळी घेत इंग्लंडच्या संघाला सुरुंग लावला. यामुळे इंग्लंडने पहिल्या डावात ११२ धावांमध्ये भारतीय गोलंदाजांसमोर लोटांगण घातले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सामाजिक बांधिलकी! धनंजय मुंडेंकडून ‘त्या’ चिमुकलीचा पहिला वाढदिवस साजरा
- मंगलाष्टके नव्हे तर ‘वंदे मातरम्’च्या सुरात जुळल्या अनाथांच्या रेशीमगाठी
- ‘आ.संदिप क्षीरसागरांनी काकांच्या कामाचे श्रेय लाटले’
- जिल्हा मध्यवर्ती बँकासह सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर
- बीडमध्ये दहावी, बारावी वगळता सर्व शाळा बंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
