Share

‘काँग्रेसचा खोटारडेपणा असाच सुरु राहिला तर काँग्रेस इतिहासजमा व्हायला वेळ लागणार नाही’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांनी देशाच्या सुरक्षिततेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडल्याचा गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. गेल्या वर्षभरात भारत-चीनवर निर्माण झालेला तणाव चर्चेद्वारे कमी झाल्यामुळे दोन्ही देशाचं सैन्य मघादी फिरत असल्याचं केंद्र सरकारद्वारे सांगण्यात आलं होतं. यावर देखील राहुल गांधी यांनी आक्षेप घेत केंद्र सरकारवर टीका केली होती.

राहुल गांधींच्या या टीकांवर भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी चोख उत्तर दिलं आहे. ‘अर्जुन एम के १ ए हा लढाऊ रणगाडा संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (DRDO) लढाऊ वाहने संशोधन व विकास आस्थापनेने उत्पादित केला आहे. या लढाऊ रणगाड्याला हंटर किलर रणगाडा असेही म्हटले जाते,’ असं सांगतानाच देशाचा संरक्षण विभाग सक्षम असतानाही राहुल गांधी मात्र वारंवार संरक्षण विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असून विनाकारण अपप्रचार करत आहेत,’ असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

तर, ‘कांग्रेसच्या खोटारडेपणाच्या राजकारणामुळे ४०० जागांवरुन काँग्रेसला सध्या फक्त ४० जागा कशाबशा टिकविता आल्या. भविष्यातही अशीच परिस्थिती राहली तर काँग्रेस पक्ष हा इतिहासातजमा होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना या गोष्टींचे लवकरच आत्मचिंतन केल्यास ते त्यांच्यासाठी व काँग्रेससाठीही नक्कीच हिताचे असेल,’ असा टोला देखील पाटील यांनी काँग्रेसला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!