Share

‘तुम्ही ७० वर्षांत काय केलं, याचा हिशोब आणलाय का’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : आज लोकसभेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरूस्ती) विधेयक २०२१ पारित करण्यात आलं आहे. यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० हटवण्यावरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरूस्ती) विधेयक २०२१ चं जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याशी कोणत्याही प्रकारचं घेणंदेणं नाही. योग्य वेळ आल्यानंतर जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यात येणार’, असे अमित शाह यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

शाह यांनी कलम ३७० हटवण्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर उत्तर देताना विरोधकांना फैलावर घेतले आहे. ‘या ठिकाणी विचारण्यात आलं की, कलम ३७० हटवल्यानंतर जी आश्वासनं दिली त्या दृष्टीनं काय केलं गेलं? कलम ३७० हटवून १७ महिने झाले आणि तुम्ही आमच्याकडून हिशोब मागत आहात. तुम्ही ७० वर्षांत काय केलं याचा हिशोब आणलाय का? जर ७० वर्ष योग्यरित्या चालला असता, तर आमच्याकडून हिशोब मागायची वेळ आली नसती’, असे म्हणत अमित शाह यांनी कॉंग्रेसचा समाचार घेतला आहे.

‘ज्यांना पिढ्यानपिढ्या शासन करण्याची संधी मिळाली त्यांनी स्वत:कडे पाहून ठरवावं की, आपण हिशोब मागण्याच्या लायक आहोत का?,’ असा सवाल करत शाह यांनी कॉंग्रेसवर घणाघात केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!