Share

रामदेवबाबांकडून अर्थसंकल्पाच कौतुक ! पतंजलीकडून पाच लाख तरुणांना मिळणार रोजगार…

Published On: 

नवी दिल्ली: सोमवारी संसदेत अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अर्थसंकल्प सादर केला. कोरोना नंतर चा अनेक अपेक्षा असलेल्या या अर्थसंकल्पावर सध्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. यावर योग गुरू बाबा रामदेव यांनी केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प सर्व समावेशक असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोर त्यांनी पतंजलीकडून पाच लाख तरुणांना रोजगार देण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

हा अर्थसंकल्पामध्ये आत्मनिर्भर भारत साठी पावले उचलण्यात आली असून यामध्ये इम्पोर्ट ड्यूटी वाढविणे, देशात खाद्य तेलांपासून ते विविध प्रकारचे मॅन्यूफॅक्चरिंग वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशामध्ये अॅग्रीकल्चर इंफ्रास्ट्रक्चर विकिसित होण्यास मदत होणार आहे. या पार्श्वभूमीवर पतंजली कडून देखील ‘रामदेव म्हणाले, मी स्वतः आजवर पाच लाख लोकांना रोजगार दिला आहे. ज्या पद्धतीने इंडोनेशिया आणि मलेशियावरून आपल्याला पॉम मागवावे लागते, त्याचे उत्पादन भारतातच वाढले, तर देशाचे दोन लाख कोटी रुपये वाचतील आणि पाच लाखहून अधिक लोकांना तर स्वतः स्वामी रामदेवच पतंजलीच्या माध्यमाने रोजगार देतील’, असेही बाबा रामदेव म्हणाले.

त्याचबरोबर या अर्थसंकल्पात सर्वांसाठीच काही ना काही आहे. तर आरोग्याच्या दृष्टीने 137 टक्क्यांच्या वाढीसर 2 लाख 32 हजार कोटी रुपयांचे बजेट स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घोषित झाले असल्याच म्हणत त्यांनी या अर्थसंकल्पाच कौतुक करताना म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!