🕒 1 min read
भारत : ब्रिस्बेन कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. 328 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने सात विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया मायदेशी परतलेली आहे.
मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा पराक्रम गाजवला.या विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. 328 धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने सात विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले.
भारतीय संघाच्या या विजयानंतर विविध स्तरातून कौतुक केलं जात आहे. या विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे. ‘खेळात अप आणि डाउन येत असतात, त्यामुळे याची मला सवय आहे. पण संघाने इतकी चांगली कामगिरी केली आहे की मला शब्दांमध्ये ती सांगण्याची गरज नाही. भारतीय खेळाडूंनी आपल्या क्रिकेटमधून उत्तर दिलं आहे. हेच सर्वात मोठं स्टेटमेंट आहे’ असं ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘आम्ही आहोत आंबेडकरवादी, लागू नका आमच्या नादी..सर करायची आहे आम्हाला मुंबईची गादी’
- मलिंगा, पॅटिन्सनसह मुंबई इंडियन्सने ‘या’ ७ खेळाडूंना दिला डच्चू !
- या बोटाची थुंकी त्या बोटावर फिरवण्यात शिवसेनेचा हात कोण धरेल; भाजप नेत्याची बोचरी टीका
- सलाम : दुर्घटनेत पत्नी गमावली, स्वतः जबर जखमी झाले मात्र रुग्णालयातही श्रीपाद नाईक ‘ऑन ड्युटी’
- दोन्ही नेत्यांसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे : नरेंद्र मोदी

