🕒 1 min read
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी संघटनांच्या आंदोलनास ५० दिवसांपेक्षाही जास्त काळ लोटला आहे. मात्र, या प्रकरणी अद्यापही तोडगा निघालेला नसल्याने हे आंदोलन सुरूच आहे.
सर्वोच्च न्यायालयाने याकडे लक्ष देत चार सदस्यीय समितीची देखील नेमणूक केली आहे. मात्र या समितीसमोर जाण्यास आंदोलक शेतकऱ्यांनी नकाल दर्शवला आहे. शेतकरी संघटना कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत.
दरम्यान या शेतकरी आंदोलनाचा आज ५३ वा दिवस असून आज दुपारी ‘संयुक्त किसान मोर्चा’ची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तर २६ जानेवारी रोजी होणाऱ्या ट्रॅक्टर परेडसंदर्भात देखील नियोजन करणार असून आज सिंघु बॉर्डरवर संयुक्त किसान मोर्चाची बैठक पार पडणार आहे.
तीन केंद्रीय मंत्र्यांसोबत शुक्रावारी पार पडलेल्या बैठकीत शेतकरी तीनही कृषी कायदे रद्द करण्याच्या आपल्या मागणीवर ठाम राहिले.साधारण चार ते पाच तास चाललेल्या बैठकीत अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे येणारी पुढील बैठक १९ जानेवारी रोजी पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- “आम्ही थंडीने मरत आहोत मात्र सरकार केवळ ‘तारीख पे तारीख’ देत आहे”
- देशाचं भविष्य, राष्ट्राची संपत्ती शिक्षण विभाग घडवितो – वर्षा गायकवाड
- राज्यातच नाही तर देशातही औरंगजेबाच्या नावाबाबत कुणी आग्रही असू नये; राऊतांचा काँग्रेसला टोला
- औरंगाबादमधील कचऱ्याचा प्रलंबित प्रश्न सहा महिन्यात सोडवण्यासाठी प्रयत्न करू- आदित्य ठाकरे
- अर्थसंकल्पापूर्वी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा केंद्र सरकारला सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
