🕒 1 min read
मुंबई : भाजपासोबतची युती तुटल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेसमोर खूप मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आतापासूनच मुंबई महापालिका जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
शिवसेनेने यासाठी अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असं म्हणत शिवसेनेने गुजराती मतदारांना साद घातली आहे. दरम्यान एका बाजूला भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे तर दुसऱ्या बाजूला शिवसेना देखील अमराठी मतांसाठी जोरदारपणे तयारीला लागली आहे.
शिवसेनेच्या या कार्यक्रमावरून भाजप व मनसेने जोरदार हल्लाबोल केल्याचं दिसून आलं होतं. आता, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिवसेनेवर टोलेबाजी केली आहे. ‘गुजराती समाजाला निवडणुकीसाठी का होईना, जवळ करण्याचा प्रयत्न शिवसेना करतेय याचा आनंद आहे. निवडणुकीच्या व्यतिरिक्तही त्यांनी गुजराती समाजाशी सौहार्द ठेवायला हवा. शेवटी तेही आपले नागरिक आहेत’ असा सल्ला त्यांनी शिवसेनेला दिला आहे.
पुढे ते म्हणाले, ‘एकीकडं अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनला शिवसेना कडाडून विरोध करतेय आणि दुसरीकडं गुजराती समाजाला जवळ घेऊ म्हणतेय. अशा कार्यक्रमांनी कोणी जवळ येत नाही. कृतीतून लोक जवळ येतात,’ असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- युवकांनो पोलीस दलात भरतीची मोठी संधी; गृहमंत्र्यांनी केली घोषणा
- महापालिका निवडणुकांतील आघाडीचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील !
- …म्हणून पंतप्रधान मोदींनी आधी स्वतःला लस टोचून घ्यावी; नवाब मलिकांची मागणी
- विरूष्काच्या घरी ‘लक्ष्मी’चं आगमन !
- १० वीच्या राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा अर्ज भरण्यासाठी मिळाली मुदतवाढ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
