Share

सरनाईकांचा क्वारंटाईन कालावधी संपला; लवकरच ईडी चौकशीला सामोरे जाणार?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापेमारी केल्यानंतर राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. प्रताप सरनाईक यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावला असून त्यांनी विलगीकरणाचं कारण देत आठवड्याची मुदत मागितली होती.

ईडीने सरनाईकांना चौकशीसाठी समन्स बजावले असून त्यांनी क्वारंटाईन असल्याचे कारण देत आठवड्याभराची मुदत मागितली होती. ते परदेशातून आले आल्यामुळे क्वारंटाईन असल्याचं ईडीला कळवलं होतं. तर, पुत्र विहंग याची पत्नी आजारी असल्याने त्याला देखील चौकशीसाठीनंतर बोलावण्यात यावं, अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी केली होती.

आज, सरनाईकांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण होत असून आता ते चौकशीला सामोरे जाणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. येत्या गुरुवारी ते ईडीच्या चौकशीसाठी हजर राहू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

संजय राऊतांच्या नातेवाईकांना देखील ईडीच्या नोटीसा – निलेश राणे

“प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई सुरू असताना याच प्रकरणात संजय राऊत यांच्याही नातेवाईकांना ईडीकडून नोटिसा पाठवण्यात आल्याची माझी माहिती आहे,” असा दावा भाजप आमदार निलेश राणे यांनी दोन दिवसापूर्वी हिंगोलीमध्ये बोलताना केला होता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!