औरंगाबाद : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्यानंतर राज्यभरात मराठा समाजाने आक्रमक होऊन आंदोलने केली. यानंतर, स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने याचिका दाखल केल्या.
मराठा आरक्षण उठवण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. मराठा संघटनांसह भाजपने देखील राज्य सरकारवर टीका केल्याचं समोर आलं होतं. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप देखील काही नेत्यांनी केला. आता, मराठा समाजाचे समन्वयक विनोद पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे.
‘राज्य सरकारने मराठा विद्यार्थ्यांचा घात केला,’ असा गंभीर आरोप त्यांनी ठाकरे सरकारवर केला आहे. आरक्षणाच्या स्थगितीमुळे अनेक प्रवेश प्रक्रियांसह पुढील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ‘मराठा समाजसोबत राज्य सरकारचं वर्तन दोषपूर्ण असून विशेष बाब म्हणून जागाही वाढवल्या नाहीत फी मध्ये सवलतही दिली नाही,’ अशी टीकाही त्यांनी केली आहे.
‘राज्य सरकारच्या भूमिकेमुळे मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे सरकारच्या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढणार, असा एल्गार त्यांनी केला असून सुप्रीम कोर्टातही राज्य सरकारची चाल ढकल सुरू असल्याचा घणाघात विनोद पाटील यांनी केल्यामुळे पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा पेटणार असं चित्र निर्माण होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजपात कामाची कदर नाही,राष्ट्रवादीत प्रवेश करुन मोकळा श्वास घेतोय : जयसिंगराव गायकवाड
- ‘मंदिर विषयावर शुद्र राजकारण करणं योग्य नाही,पण निराशा ही माणसाला स्वस्थ बसू देत नाही’
- ‘गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने जुन्या योजनांना केवळ स्थगिती देण्याचं काम केले’
- ‘मराठी माणसाने महाराष्ट्रात व्यापार उद्योग करणं, हा दिल्लीश्वरांना गुन्हा वाटत असेल’
- ‘१०५ आमदार असताना सरकार बनवता आलं नाही हे त्यांचं खरं दुखणं’


