पुणे : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अद्याप सव्वा वर्षाचा अवधी आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे नियोजन भाजपाने सुरू केल्याचे वृत्त आल्यापासून या निवडणुकीचा विषय राजकीय वर्तुळात ऐरणीवर आला आहे. भाजपने आत्तापासूनच ‘मिशन मुंबई’ सुरु केलं असून महापालिकेतील भ्रष्टाचार नियोजनाचा आभाव यावरून शिवसेनेसह महाविकास आघाडीतील पक्षांना लक्ष्य केलं.
शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने देखील देवेंद्र फडणवीस आणि भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आता उठाबशा काढत असले, तरी त्यांना माहिती झालं आहे की मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांचा पराभव होणार आहे. त्यांना आम्ही चितपट करणार आहोत. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाचही जागांवर महा विकास आघाडीचाच विजय होईल” असा हुंकार देखील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडीने पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांसंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जयंत पाटील बोलत होते. यावेळी, उद्यापासून पुण्यातील 11 तालुक्यातून संयुक्त प्रचार सुरु करणार असल्याचं सांगितलं. तर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, मंत्री विश्वजित कदम, खासदार अमोल कोल्हे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे आदी नेते उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- कर्तृत्वान मराठा स्त्री मुख्यमंत्री व्हावी, आशिष शेलारांचं पवारांसमोर वक्तव्य
- आता शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाच्या हातात; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांचे आदेश
- वीज बिलाचा प्रश्न राज्यात पेटला असतानाच, नगर जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून तब्बल १३२ कोटी रुपयांची थकबाकी!
- करोनाचा धोका पुन्हा वाढला; ‘या’ शहरात कर्फ्यू लागू
- प्रार्थनास्थळं उघडल्यामुळेच करोना रुग्ण वाढले; शिवसेनेच्या महापौरांचा अजब दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

