🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- सर्वसामान्यांना आलेल्या अव्वाच्या सव्वा वीज बिलाचा प्रश्न राज्यात सध्या चांगलाच पेटला आहे. दरम्यान, महावितरणची घरगुती, व्यापारी, औद्योगिक (लघुदाब) ग्राहकांकडे वीज बिलाची एकट्या नगर जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून तब्बल १३२ कोटी ७ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. यामध्ये तब्बल १ लाख ५६ हजार ग्राहकांनी एप्रिल महिन्यापासून वीज बिलापोटी महावितरणला एकही रुपया दिलेला नाही. या ग्राहकांचीच वीज बिलाची थकबाकी ही तब्बल ७६ कोटी २७ लाख रुपये झाली आहे.
एकट्या नगर जिल्ह्याचा विचार केल्यास या जिल्ह्यात एक एप्रिल ते १७ नोव्हेंबर या काळात घरगुती, व्यापारी, औद्योगिक (लघुदाब) या अकृषक ग्राहकांकडे तब्बल १३२ कोटी ७ लाख रुपये वीज बिलापोटी थकबाकी झाली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यामध्ये ६ लाख ७५ हजार अकृषक ग्राहक आहेत, त्यापैकी तब्बल १ लाख ५६ हजार ग्राहकांनी एप्रिल महिन्यापासून वीज बिलापोटी महावितरणला एकही रुपया दिला नाही. या १ लाख ५६ हजार ग्राहकांची एप्रिल महिन्यापासूनची थकबाकी ही ७६ कोटी २७ लाख रुपये झाली असल्याचे महावितरणमधून सांगण्यात आले.
सर्वसामान्यांना आलेल्या अव्वाच्या सव्वा वीज बिलाचा प्रश्न राज्यात सध्या चांगलाच पेटला आहे. त्यामुळे वीज बिलात सवलत मिळेल, या आशेने अनेकांनी हे बिल भरले नव्हते. मात्र आता वाढीव वीज बिले भरावीच लागतील, असे संकेत राज्य सरकारने दिले असल्याने त्याअनुषंगाने ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणची यंत्रणा कामाला लागली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुंबईतील शाळा यंदाच्या वर्षी बंदच!; आयुक्तांनी दिले आदेश
- देशात लवकरच येणार ‘खाजगी रेल्वे’ ! 16 खासगी कंपन्यांकडून अर्ज दाखल…
- ‘भाजप सरकारच्या काळात सीबीआयची अवस्था पानटपरी सारखी झालीय’
- ‘सिर्फ़ बातों की है मोदी सरकार, कुचल रही ग़रीबों के अधिकार’
- कोरेगाव भीमा प्रकरणातील संशयित आरोपी वरवरा राव यांना ‘नानावटी’मध्ये हलवले


