🕒 1 min read
मुंबई : कोरेगाव भीमा प्रकरणातील संशयित आरोपी व तमिळ साहित्यातील कवी वरवरा राव सध्या न्यायालयीन कोठडीत असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजत आहे. तर, त्यांना चांगल्या रुग्णालयात दाखल करावे अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केंद्र तसेच राज्य सरकारकडे केली होती.
यासोबतच राव यांची ढासळती प्रकृती लक्षात घेता त्यांच्या कुटुंबीयांकडून जामीन देण्याची मागणी केली जात होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालाकडून अनेकदा ही विनंती फेटाळण्यात आली होती. आता, न्यायालयाने वरवरा राव यांना काहीसा दिलासा दिला आहे. त्यांची प्रकृती लक्षात घेता प्रकृती लक्षात घेता न्यायालयाने त्यांना रुग्णालायात दाखल करण्याची परवानगी दिली आहे.
न्यायालयाने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार वरवरा राव यांना 15 दिवसांसाठी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात येईल. त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार उचलेल. तसेच वरवरा राव यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याचीही सशर्त परवानगी देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाचवण्यासाठी सरकारची धडपड सुरु आहे – राम कदम
- ‘दोन दिवसांत शनिवार वाडा उघडा अन्यथा…’ ; ब्राह्मण महासंघाचा आक्रमक इशारा
- भारताने पुन्हा एकदा विश्वगुरू बनण्याच्या आकांक्षा ठेवली पाहिजे- उपराष्ट्रपती
- ‘बळजबरीनं वीजबिल घेतलं जाणार असेल तर तुमची गाठ मनसेशी आहे हे लक्षात ठेवा’
- सरकार नाकर्तेपणा लपवण्यासाठी लोकशाहीवर गदा आणण्याचे काम करत आहे – भाजप

