Share

केंद्राकडून पूरग्रस्तांना ७०१ कोटींचा निधी, सदाभाऊ खोत यांनी मानले मोदींचे आभार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यावर नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीत राज्यावर संकट कोसळले असताना केंद्राने राज्याला मोठी मदत केली आहे. राज्यातील पूरग्रस्त भागातील नुकसानग्रस्तांसाठी केंद्राने ७०१ कोटींचा निधी दिला असल्याचे राज्याचे माजी कृषिमंत्री तसेच विधानपरिषदेतील आमदार सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

सदाभाऊ यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे. सोबतच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचेही ७०१ कोटी दिल्याबद्दल आभार मानले आहे.

राज्यात समोर आलेल्या आकडेवारीनुसार सहा जिल्ह्यांमध्ये १६ हजार घरे पुरामुळे बाधित झाली आहेत. तर राज्यातील रस्ते, शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्याला नव्याने उभारणीसाठी अनेक राजकीय पक्षांनी निधी जमा केला आहे. राष्ट्रवादीकडून २ कोटींची मदत पूरग्रस्तांसाठी देण्यात येणार आहे. तर अनेक खासदार, आमदार तसेच नगरसेवकांनी आपला एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी दिला आहे. आता केंद्राकडून सर्वाधिक ७०१ कोटींची मदत दिल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्याच्या उभारणीत याचे मोठेच योगदान असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!