🕒 1 min read
औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांचा संप दिवसेंदिवस वाढतच आहे. रुजू झालेल्या तुटपुंज्या कर्मचाऱ्यांवर एसटी धावत आहे. आज औरंगाबाद विभागातून ४० बसेस धावल्या. ४० बसेसच्या ५९ फेऱ्या झाल्या. तर ११८५ प्रवाशांनी जिल्ह्यातील सिल्लोड, कन्नड जालना यांसह इतर ठिकाणी प्रवास केला.
एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यशासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात महामंडळ कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. अद्यापही हा संप सुरूच आहे. औरंगाबाद विभागात आत्तापर्यंत ६१ कर्मचारी रुजू झालेले आहेत. मात्र परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेल्या आवाहनाला कर्मचाऱ्यांकडून फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही डिसेंबर रोजी होणाऱ्या सुनावणी कडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले असून त्यानंतरच योग्य ते निर्णय घेतला मंगळवारी (दि.१३) औरंगाबाद-पुणे मार्गावर पंधरा खासगी शिवशाही चालवण्यात आल्या.
आगार क्र १ सिडको येथून जालना मार्गावर आठ बसने सोळा फेऱ्या करण्यात आल्या. यात ५६४ प्रवाशांनी प्रवास केला. औरंगाबाद-सिल्लोड मार्गावर ३ बसने ६ फेऱ्या केल्या. औरंगाबाद-कन्नड मार्गावर २ बसने ४ फेऱ्या केल्या. तर औरंगाबाद-नाशिक मार्गावर ६ शिवशाही बसच्या ६ फेऱ्या, कन्नड-औरंगाबाद मार्गावर ३ बसने ६ फेऱ्या रुजू झालेला नाही. तर सिडको बकेल्या. एकुण ४० बसने ५९ फेऱ्या केल्या असून ११८५ प्रवाशांनी आज एसटीने प्रवास केला आहे. औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानक, सिडको बसस्थानकात एकही नवा कर्मचारी आज रुजू झालेला नाही.
महत्वाच्या बातम्या
- 2 दिवस उशिरा का होईना पवार साहेबांना बड्डे गिफ्ट मिळालं; राणेंचा खोचक टोला
- ‘अकोल्यात विश्वासाला तडा, पण कोण्या एका पक्षाला दोष देऊन चालणार नाही’
- राज ठाकरेंनी सांगितला एसटी संपावर ‘हा’ उपाय
- कामं आम्ही करायची आणि मत मात्र दुसऱ्याला; राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
