Share

‘देशातील ३६ मंत्र्यांनी शहाण्यासारखी यात्रा काढली, मात्र एका अतिशहाण्याने..’

Published On: 

नाशिक: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या राजकीय नाट्यानंतर त्यांनी पुन्हा त्यांची अर्धवट राहिलेली जनआशीर्वाद यात्रा सुरु केली आहे. मात्र यावेळी शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी राणेंना जनआशीर्वाद यात्रेवरून चांगलाच टोला लगावला आहे.

केंद्रीय मंत्री भारती पवार, भागवत कराड आणि कपिल पाटील यांनी शांतपणे मोदींनी सांगितल्याप्रकारे जनआशीर्वाद यात्रा काढली. तसेच देशातील ३६ मंत्र्यांनीही शहाण्यासारखी यात्रा काढली. पण एका अतिशहाण्याने यात्रा काढली ज्यातून फक्त सेनेची बुराई केली आहे. त्यांनी केंद्र सरकार आणि मोदींच्या कामाचा कुठलाच प्रचार केलेला नाहीये. असे म्हणत त्यांनी राणेंवर टीका केली आहे.

दरम्यान यावेळी त्यांनी भाजपला इशाराही दिला आहे. जेव्हापासून भाजप पक्षात नारायण राणे यांनी प्रवेश केला आहे. तेव्हापासून भाजप दहा फुट मागे जात आहे. एक दिवस असा येईल की, भाजप अर्ध्या फुटावर जाणार. भाजपाने हा इशारा समजून घ्यायला हवा. एक दिवस राणेंचा भाजपला मोठा फटका बसणार असल्याचा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे तुम्ही यात्रा करा नाहीतर येड्याची जत्रा करा. अशी टीका राऊत यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!