🕒 1 min read
अमरावती : कथीत त्रिपुरा घटनेचे पडसाद अमरावती जिल्ह्यात उमटले होते. रझा अकादमीने पुकारलेल्या बंद दरम्यान मोर्चा काढण्यात आला त्याला हिंसक वळन लागून जाळपोळीसह तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत ३१५ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिली आहे.
यावेळी आरती सिंह म्हणाल्या, अमरावती शहरामधील सर्व व्यवहार सुरळीत झाले आहे. अमरावतीमध्ये मागील आठवड्यात आसाममधील घटनेच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम संघटनांनी आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजपाने केलेल्या मोर्चांदरम्यान हिंसा झाली होती. यानंतर शहरामध्ये सुरक्षेत वाढ करण्यात आली. आता शहरातील सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. असे शहर पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह म्हणाल्या.
अमरावती शहरातील परिस्थिती सर्वसामान्य झाली असून जवळपास १५ तास शहरातील बाजारपेठ सुरू राहणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. शहरामधील परिस्थिती पाहता सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत शहरातील बाजारपेठ सुरू राहणार असून रात्री ९ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजतापर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे, अशी माहिती सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
अमरावती हिंसाचारदरम्यान झालेलं नुकसान, लूटमारीविरोधात पोलिसांनी आतापर्यंत एकूण ५७ गुन्हे दाखल केल्याचं आयुक्तांनी सांगितलं. या ५७ गुन्ह्यांमध्ये ३१५ आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात असल्याची माहिती सिंह यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- परमबीर सिंग यांच्या वकिलांचा चौकशी आयोगासमोर मोठा खुलासा; म्हणाले…
- आम्ही शेवटपर्यंत एसटी कामगारांसोबत-सदाभाऊ खोत
- आंदोलन रबरासारखं, जास्त ताणल्यास तुटतं; सदाभाऊ खोत यांचं सूचक वक्तव्य
- शरद पवारांनी घेतली शशिकांत शिंदेंची भेट; बंद दाराआड चर्चा
- ओबीसींनी राजकीय आरक्षण ठाकरे सरकारमुळेच गमावले; भाजपचा आरोप!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
