मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील नेते, मंत्र्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांची मालिका सुरु केलेले भाजपचे फायरब्रँड नेते किरीट सोमय्या यांनी आता आणखी एका नेत्याला धारेवर धरलं आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या कुटुंबाला तब्बल 300 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कथित घोटाळ्यांच्या आरोप-प्रत्यारोपाला पुन्हा एकदा ऊत येणार असून, सोमय्यांनी आता नांदेड आणि धर्माबादला जाण्याचा इशारा दिला आहे.
आयकर खात्याने आज पुन्हा नांदेड, धर्माबाद शाखेत छापा मारला आहे. अशोक चव्हाण कुटुंबाला 300 कोटींचे कर्ज देण्यात आले आहे, असा खळबळजनक दावाही सोमय्यांनी केला. याचा पाठपुरावा करण्यासाठी आपण नांदेड, धर्माबादला जाणार आहोत. बुलढाणा अर्बन नागरी पतपेढीचा दुरुपयोग झाला आहे, असा आरोपही किरीट सोमय्यांनी केला आहे.
दरम्यान, किरीट सोमय्यांनी शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्यावरही आज जोरदार टीका केली. ‘आज बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आहे आणि तिकडे अर्जुन खोतकर हिरवे झाले आहेत. याचाही पाठपुरावा मी करणार आहे. जनतेला या घोटाळेबाजांचा हिशोब पाहिजे. उद्धव ठाकरेंकडे अर्जुन आहेत, त्यांना पैसे हवे आहेत’, असा आरोपही सोमय्यांनी केला आहे.
पुन्हा एकदा आयकर खात्याची बुलडाणा अर्बन नागरिक पतपेढीचा नांदेड धर्माबाद शाखेची
चौकशी सुरु.अशोक चव्हाण मित्र परिवार व "शेतकऱ्यांचा" नावाने ₹३०० कोटी रुपयांचे नामी, बेनामी व्यवहार.
त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी येत्या ४ दिवसात नांदेड, धर्माबादला जाणार.@Dev_Fadnavis pic.twitter.com/j79v1O6ldO
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 17, 2021
महत्वाच्या बातम्या:
- कंगनाच्या वक्तव्यावर सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीची प्रतिक्रिया; म्हणाल्या…
- ‘धर्मयुद्ध बाजूला ठेवा, घटना मोठी आहे, असे सांगणारे बाळासाहेब होते’
- उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व हे बेगडी हिंदुत्व; केशव उपाध्येंची मुख्यमंत्र्यावर टीका
- एसटी महामंडळाची कर्मचाऱ्यांना नोटिस; २४ तासांत कामावर हजर रहा अन्यथा…
- ‘विस्कळीत विचारांच्या अवाढव्य हिंदुत्वाला बाळासाहेबांनी वास्तूचे रूप दिले’


