Share

शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी राज्याला १२२ कोटींचा निधी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अवेळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानापाई राज्य सरकारने १२२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. मार्च, एप्रिल व मे २०२१ या कालावधीत कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांत शेतीपिकांसह फळबागांचे नुकसान झाले होते. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने नुकसानीपायी बाधित झालेल्या क्षेत्रासाठी १२२ कोटी २६ लाख ३० हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीपायी मदत करण्यासाठी केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य आपत्ती प्रतिसाद निधी दरानुसार मदत अनुज्ञेय करुन एकूण १२२ कोटी २६ लाख ३० हजार इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. तसे आदेश विजय वडेट्टीवार यांनी विभागीय आयुक्ताना दिले आहेत.

यात कोकण विभागासाठी २९ लाख ३० हजार रुपये, औरंगाबाद विभागासाठी १५ कोटी ५१ लाख ५४ हजार रुपये, पुणे विभागासाठी ३ कोटी १६ लाख ७५ हजार रुपये, नाशिक विभागासाठी ५९ कोटी ३६ लाख ३४ हजार रुपये, अमरावती विभागासाठी ३८ कोटी ८७ लाख ५६ हजार रुपये तर नागपूर विभागासाठी ५ कोटी ४ लाख ८१ हजार रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. निधी मंजूर केल्याचा शासन निर्णय राज्य सरकारने जारी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!