मुंबई : गेल्या वर्षी निसर्ग वादळाने महाराष्ट्राला दणका दिल्यानंतर आता ‘तौक्ते’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. गोव्याकडून आलेलं हे वादळ जरी कोकण किनारपट्टीच्या बाजूने सरकलं असलं तरी कोकणातील गावांसह पश्चिम महाराष्ट्रात देखील सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान केलं आहे. पुढे हे तौत्के चक्रीवादळ सौराष्ट्रच्या किनारपट्टीजवळ गुजरातमध्ये धडकले. गुजरातमध्ये वादळामुळे १६ हजारांहून जास्त घरांचे नुकसान झाले आहे. तसेच ४० हजार झाडे आणि १० हजारांहून अधिक विजेचे खांब पडले आहेत.
दरम्यान, या वादळानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप हे सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. तौत्के चक्रीवादळाचा गुजरातला जोरदार तडाखा बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादळग्रस्त भागाची बुधवारी दुपारी पाहणी केली. या दौऱ्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी गुजरातसाठी तब्बल एक हजार कोटींच्या मदतनिधीची घोषणा केली आहे.
परंतु पंतप्रधान मोदींनी गुजरातला मदत केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राला देखील या चक्रीवादळाचा चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे मोडी यांनी महाराष्ट्राला देखील मदत करणे अपेक्षित आहे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ गुजरातचा दौरा करून गुजरातलाच एक हजार कोटी रूपयांची आर्थिक मदत केली. पण महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत या वादळाने झालेल्या नुकसानभरपाईबाबत मदतच काय पण विचारपुसदेखील केली नाही,’ अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केली आहे.
तौक्ते चक्रीवादळाने केरळ, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांत थैमान घातले. कोकणाला सर्वाधिक फटका बसून नागरिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी गुजरातला सढळ हस्ते १००० कोटी रुपयांची मदत केली, परंतु महाराष्ट्रात झालेली हानी त्यांना दिसली नाही@PMOIndia
— महेश तपासे Maehesh Tapasey (@maheshtapase) May 20, 2021
राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे याबाबत बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्याला सढळ हस्ते 1 हजार कोटी रुपयांची मदत केली, परंतु महाराष्ट्रात झालेली हानी त्यांना दिसली नाही. कोकणातल्या माणसावर नरेंद्र मोदी सरकारने अन्याय केला आहे. देशाचे पंतप्रधान राज्याराज्यांमध्ये भेदभाव करतील ही अपेक्षा नव्हती. वास्तविक सगळ्यांनाच चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई पंतप्रधान नरेंद्र मोदी देतील ही अपेक्षा होती परंतु जिथे सरकार तिथेच मदत कदाचित अशी भाजप सरकारची भूमिका असावी अशी टीकाही तपासे यांनी केली आहे.
परंतु महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोकणातल्या शेतकरी बांधव व नागरिकांच्यासोबत या कठीण काळात खंबीरपणे उभी आहे@NCPspeaks#TauktaeCyclone #CycloneTaukte #CycloneAlert #CycloneTauktaeupdate #Cyclone
— महेश तपासे Maehesh Tapasey (@maheshtapase) May 20, 2021
दरम्यान, ‘महाराष्ट्राला बसलेला फटका पाहता पंतप्रधान महाराष्ट्राला दीड हजार कोटींची मदत जाहीर करतील,’ असा टोला उपरोधिक टोला शिवसेना नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- उन्हाचा तडाखा! चोरट्यांचा कोल्ड्रिंक्सच्या दुकानावर डल्ला, संतोषीमातानगरात घडली घटना
- ‘मोदी कशाचीही जबाबदारी घेत नाहीत’, भाजप खासदाराचा घरचा आहेर
- मोठी बातमी! केंद्राकडून ‘म्युकरमायकोसिस’चा साथरोग कायद्यात समावेश, नवीन नियम लागू
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंचा दौरा म्हणजे लिपस्टिक दौरा’, नितेश राणेंची टीका
- ‘आम्हाला बोलू दिले नाही तर मग बोलवलं कशाला?’, ममता पंतप्रधान मोदींवर भडकल्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

