🕒 1 min read
पुणे : दरवर्षी १ जानेवारी हा दिवस ‘शौर्य दिवस’ म्हणून साजरा करण्यात येत असून यंदाच्या विजयस्तंभ शौर्य दिनाचे हे २०४ वे वर्ष आहे. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथील विजयस्तंभाला अभिवादन केले. तसेच त्यानंतर माध्यमांशी संवाद साधत असतांना अजित पवार यांनी ५ दिवसांमध्ये १० मंत्री आणि २० आमदार कोरोनाबाधित झाल्याची चिंताजनक माहिती यावेळी दिली आहे.
यावेळी बोलत असतांना अजित पवार म्हणाले की,’कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांच्या वाढीच्या प्रमाणाचा अंदाज घेऊन नियम लागू करण्याबाबत विचार केला जाणार आहे.’ तसेच आत्तापर्यंत १० मंत्री आणि २० पेक्षा जास्त आमदार पॉझिटिव्ह आले त्यामुळे काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, असेही पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड(Varsha Gaikwad) तसेच राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी(K.C.Padvi) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर अजित पवार यांनी आज ५ दिवसांमध्ये १० मंत्री आणि २० आमदार कोरोनाबाधित झाल्याची माहिती दिल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कोरेगाव भीमाचा इतिहास महाराष्ट्राच्या त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे’
- आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया- मुख्यमंत्री ठाकरे
- ‘या सरत्या वर्षातील नकारात्मकता मागे सारून भविष्यकाळात नव्या उमेदीने जगण्याचा संकल्प करूया’
- ‘…तर कठोर निर्बंध लागू करणार’, अजित पवारांचा इशारा
- ठाकरे सरकारने ‘भ्रष्टाचार युक्त महाराष्ट्र’ केले आपण ‘भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र’ करूया- किरीट सोमय्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
