Share

दुसऱ्या डोससाठी औरंगाबादेत तब्बल १ लाखांची ‘वेटिंग’!

Published On: 

औरंगाबाद : महापालिकेला जवळपास पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी पहाटे ७ हजार लसी मिळाल्या होत्या. मात्र जवळपास चार तासांमध्येच त्या संपल्याने आजपासून पुन्हा एकदा लसीकरण बंद राहणार आहे. त्यासोबतच दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या जवळपास १ लाखांच्या जवळपास पोहचल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढण्याची चिन्हे आहेत. लसींच्या पुरवठ्यात वरिष्ठ पातळीवरुन नेमक्या अडचणी का येत आहेत हे सांगता येणार नाही. मात्र ऑगस्टपर्यंत लसीकरण पुन्हा सुरळीत सुरू होईल अशी माहिती पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

कोरोना प्रतिबंधक लसींचा गेल्या महिन्यापासून तुटवडा आहे. महापालिकेला एका आठवड्यासाठी शासनाकडून पाच ते दहा हजार लसींचा पुरवठा केला जात आहे. लस घेणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने लसीकरण केंद्रांवर रांगा लागत आहेत. ८४ दिवसांपूर्वी लस घेतलेल्या अनेकांच्या दुसऱ्या डोसची तारीख येत आहे. अनेकांची तर दुसऱ्या डोसची तारीख निघून गेल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या आता एक लाखांवर जाऊन पोहोचली आहे.

मात्र पुरवठा होत नसल्याने एवढ्या मोठ्या संख्येला दुसरा डोस पालिका कसा देणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या, राज्यशासन लसींच्या पुरवठा कुठे आणि किती करायचा याबाबत निर्णय घेत असते. त्यामुळे पुरवठा कधी होईल, किती होईल याबाबत मनपा सांगू शकत नाही. दुसऱ्या डोसची वेटिंग वाढली असली तरीही कुणाला काही त्रास झालेला नाही. मात्र ऑगस्टपर्यंत परिस्थिती बदलेल आणि लसीकरण सुरळीतपणे सुरू देखील होईल अशी माहिती डॉ. पाडळकर यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!