Share

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मनसे आक्रमक; भिवंडीत टोलनाका फोडला

Published On: 

🕒 1 min read

भिवंडी: भिवंडीतील कशेळी ते अंजुरफाटा रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्ताच चांगला नाही मग टोल कशाचा? असा सवालही मनसेने केला आहे.

मनसेने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे अल्टीमेटम २० दिवसांपूर्वी दिला होता. मात्र तरीही प्रशासनाने दखल घेतली नाही, अखेर मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन मनसे स्टाईलने आंदोलन करत ठाणे-भिवंडी रस्त्यावरील कशेळी टोलनाका लोखंडी रॉड व काठ्यांच्या सहाय्याने फोडला आहे.

यापूर्वी या रस्त्याच्या दुरुस्थीच्या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन मनसेने केले होते. या आंदोलनाची दखल न घेतल्याने त्यानंतर टोलनाका मनसे कार्यकर्त्यांनी बंद केला होता. मात्र गुरुवारी टोल वसूल करणाऱ्या सुप्रिम कंपनीने हा टोल नाका पुन्हा सुरु केला. या कंपनीने टोलनाका सुरु केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.

आधी रस्ता दुरुस्थ करा, मगच टोल नाका सुरु करा अशा घोषणाही यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. मनसेने या रस्त्याच्या दुरुस्थीसाठी मुंडन आंदोलन केले होते. मात्र प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही. अखेर मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!