🕒 1 min read
कोल्हापूर:- कोल्हापूर महापालिकेची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढणार, अशी चर्चा सुरू होती. मात्र या चर्चेला मंत्री सतेज पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी पूर्णविराम दिला आहे. कोल्हापूर महापालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार आहे. निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडी स्थापन करण्यात येईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, स्वबळावर लढण्याची भूमिका आधी कोणी घेतली, यावरुन काँग्रेस नेते सतेज पाटील आणि शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यात वाकयुद्ध रंगलं आहे. स्वबळाची भाषा सर्वात आधी राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना मेळाव्यात केल्याचा दावा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला. क्षीरसागर यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला. सतेज पाटील शिवसेना आणि राष्ट्रवादीला टेकओव्हर करायचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राजेश क्षीरसागर यांनी केला.
2014 मध्ये सतेज पाटील यांचा पराभव झाला. 2017 मध्ये त्यांची विधानपरिषदेवर नेमणूक झाली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांनी बंटी पाटलांना मतदान केलं. 2019 च्या विधानसभेला त्यांनी धोका दिला. जेव्हा लागतं, तेव्हा निश्चितपणे शिवसेनेकडून घेतात. बंटी पाटील विधानसभेची पायरी चढण्याची पहिली वेळ होती, तेव्हा शिवसेनेने त्यांना जाहीर पाठिंबा दिला होता. शिवसेनेचं बोट धरुन ते विधानसभेत पोहोचले. ते आज विसरले आहेत, अशी खंत क्षीरसागर यांनी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात रिपाइंचे 50 लाख सदस्य करा; रामदास आठवलेंचे कार्यकर्त्यांना आदेश
- महाआघाडी सरकारने महिलांच्या विषयात तरी राजकारण करू नये- भाजपा
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर अतिप्रसंगाचा गुन्हा मात्र अटक नाही; चित्रा वाघ यांचे गंभीर आरोप
- मुंबईतील शाळा-महाविद्यालयांबाबत महापालिकेने घेतला महत्वाचा निर्णय!
- ‘मुंबईत महापौर बनवायला काँग्रेसकडे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि काही मतदार शिल्लक राहिलेत का?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
