🕒 1 min read
बीड : आज दि. १६ जुलै रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे दहावीचा निकाल उशिरा लागला आहे. यंदा दहावीला एकूण ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. या विद्यार्थ्यांवर विविध स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘दहावीची परीक्षा म्हणजे करिअरचा एक महत्त्वपूर्ण टप्पा. कोरोनाच्या कठीण काळात ऑनलाइन या नवीन शिक्षण पद्धतीला आत्मसात करत या टप्प्यात यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा’ असे ट्विट मुंडे यांनी केले आहे.
यंदा कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. बोर्डाने पहिल्यांदाच अशा पद्धतीने परीक्षा रद्द करण्याची वेळ आली. विद्यार्थ्यांचे दहावीचे मूल्यांकन त्यांच्या अंतर्गत मूल्यमापन अधिक नववीचा वार्षिक परीक्षेचा निकाल या आधारे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. पण निकाल लागूनही अनेकांना आपले गूण पाहता आलेले नाहीत. दुपारी १ वाजता निकाल लागणार असे सांगण्यात आले होते. परंतू, चार तासानंतरही वेबसाईट क्रॅशची अडचण दूर न झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या
- ‘जे काँग्रेस नेते भाजपला घाबरतात त्यांना पक्षातून हाकलून द्या’, राहुल गांधींची सडेतोड भूमिका
- ‘इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब..’ अमृता फडणवीस यांचा शिवसेनेवर निशाणा
- ‘राज्य सरकारचा गूण दहावी निकालाच्या वेबसाईटला लागला, दोन्हीही ठप्पच!’ भाजपचा टोला
- ‘श्रीपादचे छिंदम’चाळे सुरूच! टपरी चालकाला शिवीगाळ करत मारहाण; अॅट्रॉसिटी दाखल
- ‘कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना प्रत्येकी ५ लाखांची मदत करा’, मुख्यमंत्र्यांना १४०० इमेल्स
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
