Share

‘इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब..’ अमृता फडणवीस यांचा शिवसेनेवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. रात्रभर कोसळणाऱ्या पावसानं अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. मुंबईबरोबरच ठाणे व नवी मुंबईतही पावसाची संततधार सुरूच आहे. शुक्रवारी सकाळीही पावसाचा जोर कायम राहिल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले होते. पावसाचा जोर ओसरल्यानंतरही पाणी कायम होते. त्यामुळे सकाळी ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकरांना साचलेल्या पाण्यातून वाट काढत जावं लागलं.

दरम्यान, साचलेल्या पाण्यातून चालताना अंदाज न आल्यामुळे अंधेरी भागात एक पादचारी महिला पाय अडकून पडली. सुदैवाने एका महिलेने वेळीच सावरल्याने ती मॅन होलमध्ये पडता-पडता बचावली.

मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई केली नाही, तसेच रस्त्यावरील खड्डे बुजविले नाहीत. त्यामुळे अनेक अपघात होत आहेत. यामुळे विरोधकांनी मनपात सत्तेत असलेल्या शिवसेनेला लक्ष्य केले आहे. त्याच अनुषंगाने आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबईतील सध्याच्या परिस्थितीवरून शायरीतून टीका केली आहे.

‘इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब, पर ढूँढोगे तो मुजरिम एक ना मिलेगा जनाब!’ असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे. अमृता या विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सरकारवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करत असतात. त्यातच आता त्यांनी मुंबईतील खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित करत नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. यावर शिवसेना पक्ष काय प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!