🕒 1 min read
मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल आज शुक्रवारी, दि. १६ जुलै रोजी दुपारी १ वाजल्यापासून जाहीर झाला आहे. पण, निकालाच्या साइटवर ट्रॅफिक वाढल्याने साइट क्रॅश झाली आहे. त्यामुळे निकाल लागूनही तो दिसत नसल्याने विद्यार्थी आणि त्यांचे पालकही वैतागले आहेत.
याच मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला आहे. ‘राज्य सरकारचा गूण दहावी निकालाच्या वेबसाईटला लागला, दोन्हीही ठप्पच’ असा टोला त्यांनी लगावला आहे. ‘राज्यातील ठप्प आघाडी सरकारचा, जनतेला प्रतिसाद न देण्याचा ठाकरे सरकारचा गुण वेबसाईटला लागला का?’ असा सवाल केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं पत्रकार परीषद घेत दहावीचा निकाल आज जाहीर केला. दुपारी एक वाजता मुलांना निकाल कळणार होता. मात्र बोर्ड ने दिलेली साईट ओपन होत असल्याने निकाल मिळण्यास उशीर झाला. तब्बल तीन तास उलटूनही अद्याप निकाल मिळालेला नाही. त्यामुळे अनेक मुलांची निराशा झाली. बोर्डाकडून निकालासाठी दोन साईट देण्यात आल्या होत्या. मात्र या साईट क्रॅक झाल्यामुळे अद्यापही निकाल मिळालेला नाही. निकाल काय लागला हे न कळल्यानं पालकांमध्ये ही नाराज आहेत.
विभागनिहाय टक्केवारी
कोकण – १०० टक्के
पुणे- ९९.९६ टक्के
नागपूर – ९९.८४ टक्के
औरंगाबाद – ९९.९६ टक्के
मुंबई- ९९.९६ टक्के
कोल्हापूर -९९.९२ टक्के
अमरावती – ९९.९८ टक्के
नाशिक – ९९.९६ टक्के
लातूर – ९९.९६ टक्के
महत्वाच्या बातम्या
- ‘श्रीपादचे छिंदम’चाळे सुरूच! टपरी चालकाला शिवीगाळ करत मारहाण; अॅट्रॉसिटी दाखल
- ‘कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना प्रत्येकी ५ लाखांची मदत करा’, मुख्यमंत्र्यांना १४०० इमेल्स
- ‘..तर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर गंगामय्याचा कोप नक्कीच होणार!’, वारीच्या मुद्द्यावरून शिवसेनेची टीका
- पंकजा मुंडे अडचणीत! वैद्यनाथ साखर कारखान्यावर ईपीएफओ कार्यालयाची मोठी कारवाई
- पंत पाठोपाठ ‘या’ महत्वाच्या खेळाडूलाही कोरोनाची लागण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
