🕒 1 min read
मुंबई : काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विधानसभा अध्यक्ष्यांना राज्य सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असलेला पेनड्राईव्ह दिला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळाले. तद्पश्चात फडणवीसांना पोलिसांनी नोटीस पाठवली. तसेच याप्रकरणी काल(१३ मार्च) मुंबईच्या सायबर पोलिसांनी फडणवीसांचा दोन तास जबाब नोंदवला. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘जखमा तलवारीनेच होतात असे नाही,कधी कधी पेन ड्राईव्ह सुद्धा घायाळ करून जातो’, असे भातखळकर म्हणाले आहेत.
जखमा तलवारीनेच होतात असे नाही,
कधी कधी पेन ड्राईव्ह सुद्धा घायाळ करून जातो.@Dev_Fadnavis— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 13, 2022
दरम्यान, मुंबईच्या सायबर पोलिसांनी फडणवीसांचा दोन तास जबाब नोंदवला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन चौकशीबाबतची माहिती दिली. यावेळी बोलत असतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,‘मी गोपनीय कायद्याचा भंग केला आहे आणि मीच आरोपी आहे, असे प्रश्न मला विचारण्यात आले.’ तसेच कितीही अडकवण्याचा प्रयत्न केला तरी गप्प बसणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022: आयपीएलमध्ये गोलंदाजीबद्दल हार्दिक पंड्याने केला खुलासा; म्हणाला…
- देशात निवडणुकीपूर्वी अनेक मुद्दे जिवंत केले जातात- संजय राऊत
- “…तर भाजपला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही”, संजय राऊतांचा दावा
- सत्ताधारी पक्षाचे नेते हुकूम मानतात का?- संजय राऊत
- “गोव्यात कधीच पक्ष जिंकत नाही तर…”, संजय राऊतांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

