🕒 1 min read
मुंबई : कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या रुग्णसंख्येचे प्रमाण आटोक्यात आल्यानंतर राज्यातील शाळा, सिनेमागृहे, नाट्यगृहे आणि मंदीरे उघडण्यात आली आहेत. तसेच कार्यक्रमांमध्ये जास्त लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, आता दिवाळी जवळ आल्याने लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येत असून बाजारपेठांमध्ये गर्दी दिसू लागली आहे.
याच पार्श्वभूमीवर बोलतांना दिवाळीनंतरही कोरोना बाधितांची संख्या कमी राहिली तर, निर्बंध असलेल्या भागात शिथिलता देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन दिवाळीनंतर निर्णय घेणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.
दरम्यान, यासंदर्भात अधिक बोलत ते म्हणाले की,’लसीचा एक डोस घेतलेल्या व्यक्तींना रेल्वे प्रवास आणि मॉलमध्ये जाता येत नाही. तसेच कोविशील्ड लसीमधील दोन डोसचे अंतर ८४ दिवसांचे आहे. त्यामुळे लोकांना असुविधा होत आहे. त्यामुळे आरोग्य सेतू अपमध्ये ज्या व्यक्तीचे स्टेटस सुरक्षित असेल, अशा लोकांना सवलती देता येईल का यासंदर्भात चर्चा केली जाईल. दिवाळीनंतर करोना रुग्णांची आकडेवारी काय असेल, यावरूनच एक डोस असलेल्या लोकांना प्रवासात सवलत देण्याबाबत टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल’, असेही यावेळी टोपे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- आगामी महापालिका निवडणूकांसंदर्भात गडकरी आणि फडणवीस यांच्यात चर्चा
- ३७० कलम रद्द करुनही काश्मीरप्रश्न सुटलेला नाही- मोहन भागवत
- ‘कारवाई करणार असेल तरच यावं अन्यथा…’; उदयनराजेंचे ईडीला पुन्हा एकदा आव्हान
- कुणी ‘शेण खा’ म्हटलं तर तू खातोस का? शिवसेना आमदारांचा राष्ट्रवादीच्या आमदाराला खोचक सवाल
- मोदींची घोषणा! अयोध्येच्या तीर्थयात्रेसाठी भाजप सरकार ५० हजारांची आर्थिक मदत करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
