🕒 1 min read
मुंबई : अल्प संख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. दाऊदच्या जवळचा सहकारी रियाझ भाटी याला देवेंद्र फडणवीस यांचा राजाश्रय असल्याचा आरोप मलिक यांनी केला. तर विविध प्रकरणात आरोप असलेल्या मुन्ना यादव, हाजी अराफत आणि हाजी हैदर यांना भाजपने पदे दिली असा आरोपही मलिक यांनी केला. नवाब मलिक यांच्या प्रत्येक आरोपांवर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी उत्तर देताना आशिष शेलारांनी मलिकांना काळजी घेण्याचा खोचक सल्ला दिला आहे.
आमदार श्री. आशीष शेलार यांची पत्रकार परिषद. https://t.co/d87xjuSyUz
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 10, 2021
हायड्रोजन सोडा आता ऑक्सिजनची गरज लागेल अशी मलिक यांची परिस्थिती आहे, विविध नावे समोर आणून खूप मोठं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला, पण ते झालं नाही. हे म्हणजे अकबर बिरबलाच्या गोष्टीतील बिर्याणीसारखं आहे. संपूर्ण राज्याची यंत्रणा लावून सुद्धा फडणवीस यांना लागू शकेल असा आरोप मलिक करू शकले नाहीत, अशी टीका शेलार यांनी केली.
मलिक यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे की काय? जावयाच्या प्रेमापोटी नीच पातळीवर जाऊ नका, नवाबी पातळीवर जाऊ नका. राज्यातील अल्पसंख्याक नेतृत्व, कार्यकर्ते यांना नेस्तनाबूत करण्याचे काम मलिक यांच्याकडून होत आहे. आर्यन खान तुमच्यामुळे अडचणीत आला. शाहरुख खानला अडचणीत आणण्याचे काम केले. अशी घणाघाती टीका शेलार यांनी मलिक यांच्यावर केली.
महत्वाच्या बातम्या
- ‘बिगडे नवाब’ म्हणणाऱ्या अमृता फडणवीसांना मलिकांच्या मुलीचं सडेतोड उत्तर
- ‘आपल्या जावयाची काळी आणि बेनामी संपत्ती वाचवण्यासाठी ते दुसऱ्यांवर आरोप करतात’
- फुसक्या फटाक्यांचा धूर खूप केलात, पण पुरावे कुठे आहेत?- अतुल भातखळकर
- ‘आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीय
- १४ कोटींच्या बनावट नोटांचं प्रकरण फडणवीसांनी दाबलं; मलिकांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
