मुंबई : ब्रिस्बेन कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. 328 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने सात विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया मायदेशी परतलेली आहे.
रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताला दमदार विजय मिळाल्यामुळे आता अजिंक्यकडेच कसोटी सामन्यांचे कर्णधारपद सोपवावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. हुशार नेतृत्व व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची रहाणेची वृत्ती निवड समितीतील सदस्यांनाही भावली असल्यानेच निदान कसोटी संघाचे कर्णधारपद त्याला सोपवावे असाही विचार अनेक सदस्यांनी मांडलेला आहे.
दरम्यान, विराट कोहलीचे संघात पुनरागमन झाले. इंग्लंड विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत कोहली पुन्हा मैदानावर दिसेल. संघाचा तो नियमित कर्णधार असल्याने हे होणारच होते. मला नेतृत्वाची संधी दिली जाईल असे वृत्त माझ्याही कानावर आले आहे. मात्र, त्यात कोणतेही तथ्य नाही. कोहली पालकत्व रजेवर होता त्यामुळे तो संघात परतल्यावर तोच नेतृत्व करणार हे उघड होते. त्यामुळे सध्यातरी या विषयावर बोलण्यात रस नाही, असे मत रहाणेने व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ग्रामसेवक संजय शिंदे आत्महत्येप्रकरणी गटविकास अधिकारी, कर्मचाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल
- सॅल्यूट! बेघर बालकांना पाहून जागी झाली पोलिसांतील माणुसकी, चिमुकल्यांना मिळाला आसरा
- ‘सरकार गोट्या खेळतय का ? वेळकाढूपणा खपवून घेणार नाही’
- धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा; गंभीर आरोप करणाऱ्या रेणू शर्मांकडून तक्रार मागे
- रेणू शर्मांकडून तक्रार मागे; शरद पवार म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

