पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. 243 जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये मतदार पार पडल्यानंतर आज मतमोजणी होणार आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह 3733 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. कोरोना काळातील ही सर्वात मोठी निवडणूक आहे. राज्यात मतमोजणीसाठी 38 जिल्ह्यांमध्ये 55 मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.
नितीश कुमार पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव विजय मिळवणार हे आज स्पष्ट होईल. बिहारमध्ये 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यात मतदान झालं होतं. सर्व टप्प्यांमध्ये झालेल्या मतदानाची आज मोजणी होणार आहे. यानंतर पुढील पाच वर्षांत बिहारची सत्ता कोणाकडे जाणार हे ठरणार आहे. बिहार राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार पूर्व चंपारण, सीवान, बेगुसराय आणि गयामध्ये प्रत्येकी तीन तर नालंदा, बांका, पूर्णिया, भागलपूर, दरभंगा, गोपालगंज, सहरसामध्ये प्रत्येकी दोन मतमोजणी केंद्र बनवले आहेत.
सुरुवातीच्या कलानुसार पहिल्या काही फेऱ्यांमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन आघाडी घेतली होती मात्र आता . तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीचा आकडा कमी होताना दिसत असून, एनडीचा आकडा वाढू लागला आहे.सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये महाआघाडीने मोठी बढत घेतली होती. मात्र, महाआघाडी व एनडीए यांच्यात अटीतटीची लढत होताना दिसत आहे.
नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत असलेल्या एनडीएने देखील दमदार मुसंडी मारायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत ११८ जागांवर एनडीएने आघाडी घेतली आहे तर महागठबंधन आघाडी ११२ जागांवर आघाडी घेतली आहे. नितीशकुमार हे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा जरी भाजपने केली असती तरीही नितीशकुमार यांच्या पक्षा पेक्षा भाजपने अधिक जागांवर आघाडी घेतली आहे.
महागठबंधन आणि एनडीएच्या संख्याबळात फारसा फरक उरलेला नाही. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर ही परिस्थिती कायम राहिल्यास अपक्ष आणि विरोधी पक्षातील आमदारांना फोडून सत्ता स्थापन करण्याची संधी एनडीएला मिळू शकते.दरम्यान, लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. सध्या चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष 6 जागांवर आघाडीवर आहे. चिराग पासवान यांनी या जागा जिंकल्यास ते खरोखरच बिहारचे किंगमेकर ठरतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- बिहार निवडणुकीवर राऊतांची प्रतिक्रिया, बादशाह तो वक्त होता है….. इन्सान तो युं ही गुरूर करता है!
- बिहारचा रणसंग्राम : महागठबंधन-एनडीएने जोरदार चुरस
- बिहार विधानसभा निवडणुकीत NDAने केली शंभरी पार
- संकट पूर्णपणे टळलेले नाही, दिवाळीत जनतेने शासनाच्या सूचनांचे पालन करावे
- #Bihar : नितीशकुमारांच्या जेडीयूला मागे टाकत भाजपने घेतली मोठी आघाडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

