🕒 1 min read
बीड : साखर कारखान्यातील भ्रष्टाचार व अकार्यक्षमता संपवण्यासाठी दोन साखर कारखान्यांतील २५ किलोमीटर हवाई अंतराची अट रद्द करावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे येत्या शनिवारी (दि. ३०) दुपारी १२ वाजता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या उपस्थितीत ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी सांगितले की, गुजरात, पंजाब, उत्तर प्रदेशात १० टक्के रिकव्हरीसाठी प्रतिटन ३५०० रुपये(एसएपी) सरकारी निर्धारित किंमत असतानाही महाराष्ट्रातील साखरसम्राटांनी रिकव्हरी चोरी, काटामारी करून शेतकऱ्यांना एफआरपी वाजवी आणि किफायतशीर किमतीभोवताली गुंतवून ठेवले आहे.
महाराष्ट्रात दोन सिमेंट कारखाने, दोन कापड गिरण्या, दोन सोयाबीन तेलाचे कारखाने, दोन पेट्रोल किंवा डिझेल कारखाने, दोन मोटारसायकलींचे कारखाने, दोन लोखंडी सळयांचे कारखाने, दोन ट्रकचे कारखाने यासाठी कुठेही अंतराची अट नाही. मग साखर कारखान्यांसाठी २५ किलोमीटर हवाई अंतराची अट का, यावर ऊस परिषदेत चर्चा होणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- आगामी महापालिका निवडणूकांसंदर्भात गडकरी आणि फडणवीस यांच्यात चर्चा
- ३७० कलम रद्द करुनही काश्मीरप्रश्न सुटलेला नाही- मोहन भागवत
- ‘कारवाई करणार असेल तरच यावं अन्यथा…’; उदयनराजेंचे ईडीला पुन्हा एकदा आव्हान
- कुणी ‘शेण खा’ म्हटलं तर तू खातोस का? शिवसेना आमदारांचा राष्ट्रवादीच्या आमदाराला खोचक सवाल
- मोदींची घोषणा! अयोध्येच्या तीर्थयात्रेसाठी भाजप सरकार ५० हजारांची आर्थिक मदत करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
