🕒 1 min read
औरंगाबाद: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारचे नेते आक्रमक झाले आहेत. शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रशासन आणि भाजप सरकार ही कूटनीती खेळत असून,ईडी च्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न भाजप नेते करीत आहे, असं दानवे म्हणाले आहेत.
सत्तेचा वापर करून शासकीय यंत्रणाचा दुरुपयोग केंद्र शासन आणि भाजप करत असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी केला असून, नारायण राणे यांच्यावर भाजपने या अगोदर आरोप केले होते, मात्र नारायण राणे भाजपात आल्यानंतर आता ईडीची चौकशी त्यांची करण्यात आली नाही. यासंदर्भात भाजपकडे उत्तर आहे का, असा प्रश्न दानवेंनी उपस्थित केला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस मंत्री नवाब मलिक यांच्यावर आरोप करतात आणि ईडी लगेच चौकशी करून अटक करते. हा लोकशाहीचा खून नाही का, असा सवाल शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी केंद्र शासनाला केला आहे. केंद्रात सत्ता असल्याने शासकीय यंत्रणाचा भाजप सरकार गैरवापर करत असल्याचा आरोप यावेळी आमदार अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
…अशा धाडींमुळे काही लोकांना आसुरी आनंद होतोय- किशोरी पेडणेकर
-
“तुमचे लोक रोज गंगेत स्नान करतात अन् पाप करतात, त्यामुळे…” संजय राऊतांचा विरोधकांना खोचक टोला
-
ऋतुराज गायकवाड ऐन सामन्याआधी संघातून बाहेर ; बीसीसीआयने कारण सांगत दिले स्पष्टीकरण
-
Russia-Ukraine war : युद्धजन्य परिस्थितीतही ‘हा’ अभिनेता करतोय युक्रेनमध्ये माहितीपटावर काम
-
किरीट सोमय्यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, ‘उद्धव ठाकरे व सोनिया गांधी या दोघांसाठी आर्थिक…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
