Share

‘कशाला त्यांचं नाव घेऊन आमचा दिवस खराब करताय’; नारायण राणेंनी उडवली खिल्ली

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : राज्यात महाविकास आघडीचे सरकार आल्यापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शिवसेनेसह सरकारवर सातत्याने हल्लाबोल करताना दिसत आहेत. तर नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर शिवसेनेकडून देखील टीकास्त्र सोडण्यात आलं होतं. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज राणेंची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली.

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे हे देखील हजर होते. दरम्यान, या भेटीनंतर चंद्रकांत पाटील आणि नारायण राणे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडी सरकार राज्यात आल्यापासून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये वाद धुमसत असल्याचं अनेकदा समोर आल्यानंतर मागील काही दिवसांमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची चांगलीच जवळीक वाढल्याचं पाहायला मिळालं. राहुल गांधी हे संजय राऊत यांच्यासोबत खांद्यावर हात टाकून चर्चा करत असल्याचा फोटो देखील समोर आला आहे.

याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता, कशाला सकाळी-सकाळी त्यांचं नाव घेऊन दिवस खराब करताय, अशी खोचक प्रतिक्रिया दिली. यासोबतच, ‘राहुल गांधी ज्या पक्षावर हात ठेवतात तो पक्ष रसातळाला जातो.’ असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी होण्याच्या शक्यता असून यासाठी राज्यातील नेत्यांच्या राष्ट्रीय नेत्यांची भेटीगाठी वाढल्याच्या चर्चा आहेत. मात्र, चंद्रकांत पाटील यांच्यासह नारायण राणे यांनी या चर्चा धुडकावून लावत केवळ नवनियुक्त केंद्रीय मंत्र्यांना सदिच्छा देण्यासाठी हा दिल्ली दौरा असल्याचं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!