Share

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिस जनतेला का माहिती देत नाहीत ?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- बीडच्या परळी वैजनाथ येथील २२ वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिने पुण्यात संशयास्पद मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर काही ऑडिओ क्लिप समोर आल्याने वनमंत्री संजय राठोड हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

संजय राठोड प्रकरणावरुन विरोधकांनीही सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. अशातच या सर्व प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार नाराज असल्याची माहिती मिळत आहे.संजय राठोड यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून चौफेर टीका होत आहे. तसेच पोहरादेवी येथील शक्तिप्रदर्शनानंतर राठोड यांच्यावर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याचंही बोललं जात आहे.

दरम्यान, दोन आठवड्यांहून अधिक काळानंतर संजय राठोड यांनी माध्यमांसमोर येत पत्रकार परिषद घेतली आणि आपल्यावरील सर्व आरोप धुडकावले आहेत.मात्र, विरोधकांनी संजय राठोड यांना ‘क्लीन चीट’ दिली नसल्याचे पाहायला मिळतंय.अजूनही संजय राठोड यांच्यावर विरोधक नानाविध आरोप करत आहेत.

ज्या महाराष्ट्राचा एक वेगळाच रुबाब आणि गौरव देशात आहे, आज तोच महाराष्ट्र ठाकरे सरकार आणि त्यांच्या मंत्र्यामुळे देशभर बदनाम होतोय. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिस महासंचालक जनतेला का माहिती देत नाहीत असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

या प्रकरणातील ऑडीओ सीडी व्हायरल झाल्या असून वनमंत्री संजय राठोड यांचा सहभाग असल्याचे पुरावे पुढे येत आहेत. तरीही कोणतीही कारवाई पोलिसांनी केलेली नाही. तरी तातडीने या प्रकरणाच्या तपासाबाबतची माहिती जनतेपुढे उघड करावी, अशी मागणी दरेकर यांनी पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याकडे बुधवारी केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!