Share

रस्त्यावरील खड्डे आणि तुंबलेल्या पाण्यातून मुंबईकरांची सुटका कधी?

Published On: 

मुंबई – मुंबईत आज पावसाचा जोर असल्याने भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी तातडीने महापालिका मुख्यालयात जाऊन आपत्कालीन कक्षाच्या अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला.

मुंबईत आज अनेक भागात पाणी साचले असून दरड ही कोसळली आहे. त्यात दुपारी समुद्राला मोठी भरती असल्याने भितीचे वातावरण आहे. त्यामुळे आमदार अँड आशिष शेलार यांनी आज महापालिका मुख्यालयात जावून आपत्कालीन कक्षाकडून आढावा घेतला.

कोरोनामुळे आपत्कालीन कक्षात प्रवेश निषेध करण्यात आला असून आपत्कालीन कक्षाचे प्रमुख अधिकारी महेश नार्वेकर यांची पालिकेतील भाजप कार्यालयात भेट घेऊन आमदार अँड आशिष शेलार यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. रस्त्यावरील खड्डे आणि तुंबलेल्या पाण्यातून मुंबईकरांची सुटका कधी ? असा सवालही यावेळी त्यांनी आयुक्तांना केला आहे.

दरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून मुंबईतील हिंदमाता परिसराची पाहणी, महापालिकेचे कर्मचारी रस्त्यावर असून त्यांचं काम सुरु आहे, आवश्यक असेल तरच बाहेर पडा,असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

युपीएससी २०१९ चा निकाल जाहीर! अभिषेक सराफ महाराष्ट्रात पहिला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!